महाराष्ट्र
महाराष्ट्र या शब्दाचा उगम फारच रंजक आहे. प्राचीन काळी हा प्रांत दंडकारण्य नावाने ओळखला जायचा. इथे ऋषीमुनीतपस्वी वास्तव्य करीत असत. दंडकारण्य म्हणजे घनघोर घराण्याने व हिंस्त्र श्वपदांनी व्यापलेला. पूर्वी गुन्हेगारांना आणि दुष्टांना इथे सोडले जायचे. भयाण जंगल आणि हिंस्त्र श्वापद यांच्यामुळे व्यक्ती मृत्यूतुल्य कष्ट भोगून यमसदनी जात असे.
विदर्भ, वैराट सरकत्या राजसत्ता इथे राज्य करीत असत. पुढे कालांतराने इथे राष्ट्रकूट राजघराण्याची सत्ता आली. राष्ट्रकूट स्वतःला भारत राष्ट्राचे पालनहार समाजात असत. त्यांची सत्ता त्यांच्या शिखरकाळात मध्योत्तर भारतापासून संबंध दंडकारण्य म्हणजे सध्याच्या दख्खन प्रांतावर होती. राष्ट्रकूट म्हणजे राष्ट्राच्या एकीची समर्पित अशा परिवाराचे व त्यांच्या मांडलिकांचे कूट, म्हणजे संघ होता. या घराण्याची एक शाखा कन्नौज व दुसरी सांप्रतच्या राजस्थानात स्थायिक होती. राजस्थानातील व कन्नौज येथील ती शाखा म्हणजेच राजपूत राठोड राजघराणे.
अशी ही राष्ट्रकूटांची व्याप्ती भारताच्या बहुतांश भागावर होती. राष्ट्रकूटांच्या सेनेला राष्ट्रीक म्हटले जाऊ लागले. राष्ट्रीक म्हणजे राष्ट्रवादी/ Nationalist. या राजघराण्याच्या काळात अनेक स्थापत्य व कला यांना चालना मिळाली. पुढे या राष्ट्रकूट संचालित राष्ट्राला म्हणजेच राज्याला महान राष्ट्र, अर्थात महाराष्ट्र म्हटले जाऊ लागले. यावरून, राष्ट्रकूटांचे कार्य आणि प्रभाव लक्षात येऊ शकतो.
अशा प्रकारे दंडकारण्य प्रांत हा राष्ट्रकूटांच्या राज्यामुळे महाराष्ट्र झाला. त्यानंतरचा व विशेषकरून १७व्या शतकापासूनचा तो आजतागायत महाराष्ट्राची राष्ट्रभावना ही जगजाहीर आहे.
No comments:
Post a Comment